समता सैनिक दलाच्या वतीने “ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे सामूहिक चर्चात्मक अध्ययन ” ::
विषय :- Buddhist Movement In India : A Blue Print (DBAWS Vol. 17 Part 3 Page No.
506 )
जय भिम …
काल दि. ३० अगस्त २०१५ ला दीक्षाभूमि , नागपुर येथे समता सैनिक दलाच्या वतीने “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे सामूहिक चर्चात्मक अध्ययन ” घेण्यात आले. या अंतर्गत “ Buddhist Movement In India : A Blue Print” या बबसाहेबांच्या ४ डिसंबर १९५४ ला इंटरनेशनल बुद्धिस्ट कॉन्फरंस रंगून (बर्मा ) येथे झालेल्या भाषणाचा पुनर्राभ्यास सामूहिक रितीने करण्यात आला .
खालील मुद्दे विस्तृतपणे अभ्यासिले व निष्कर्षीले :-
a) अबौद्ध व्यक्तींना बौद्ध बनण्यासाठी बुद्ध धम्मात कुठलाच दीक्षा समारंभ बुद्धाने दिलेला नव्हता.फक्त एखाद्याला भिक्षुसंघात प्रवेश करावयाचा असेल तर तेव्हा भिक्षुंसाठी उपसंपदा विधीद्वारे तशी व्यवस्था होती. तेव्हा गृहस्थ जीवन जगणाऱ्या उपासकांसाठी दीक्षाविधी करून उपसाकांद्वारे बौद्ध धम्माची दीक्षा देण्याची व्यवस्था करणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गरजेचे वाटले आणि म्हणून १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे बाबासाहेबांनी स्वहस्ते आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन सर्व साधारण अनुयायांसाठी उपासक बनण्याची व्यवस्था सुरु केली.
b) धम्माच्या प्रचार प्रसारासाठी बौद्ध सेमिनरीची स्थापना करून त्याद्वारे प्रशिक्षित उपसकांचा पगारी प्रचारक म्हणून नेमणूक करणे आणि असा प्रचारक विवाहितही असू शकतो असे बाबासाहेबांनी त्यांच्या भाषणात नमूद केलेले आहे.
c) दर रविवारी विहारात मोठ्या संख्येने एकत्रित येऊन धम्म प्रवचन व उपासना करणे.
इछुकांनी या वर्गात सहभागी होण्यासाठी खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
9970898880 , 9403591407
सामूहिक अध्ययनाची वेळ :- दर रविवारी सकाळी ९.०० ते ११.०० दीक्षाभूमि , नागपुर .
अधिक माहितीसाठी www.ssdindia.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
शिकवा, चेतवा आणि संघटीत करा !
समता सैनिक दल.
(Headquarter, Deekshabhoomi, Nagpur)