दि. 15 ऑगस्ट 2015 रोजी समता सैनिक दलाच्या वतीने संविधान चौक, नागपुर येथे सकाळी 11 वाजता संपन्न झालेल्या स्वातंत्र्य दिनानिमित्तच्या कार्यक्रमात तरुणांनी बाबासाहेबांचे राष्ट्र निर्मितीच्या कार्यात अतुलनीय आणि अमूल्य योगदानाविषयी सामुहिकपने खास चर्चा केली.
जोवर या देशात खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची प्रामानिकपणे अमलबजावणी होणार नाही तोवर बाबासाहेबांना अभिप्रेत रिपब्लिकन राष्ट्र निर्मिती शक्य नाही तेव्हा आपणाला बाबासाहेबांनी जन्मास घातलेल्या समता सैनिक दलाच्या छत्राखालीच एकसंघ होवून रिपब्लिकन भारतात खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव घेता येईल.
उपस्थित तरुणांनी दिलेल्या ‘रिपब्लिकन भारत देशाचा विजय असो ‘ अश्या प्रचंड जयघोषणेत संविधान चौक आणि आसमंत निनादून गेले.